नवी दिल्ली : राज्यातील सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. राज्यातील फडणवीस सरकारला उद्या 5 वाजेपर्यंत सगळ्या आमदारांची शपथ देण्यात यावी, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. गुप्त मतदान देखील होणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात बहुमत सिद्ध करू, असा विश्वास सोनिया गाधींनी व्यक्त केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकासआघाडीच्या गटात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्राचा सत्तापेच सर्वोच्च न्यायालयाच्या दारी गेला होता. या निर्णयाकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते. उद्याच्या उद्या बहुमत चाचणी व्हावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, 27 नोव्हेंबरला उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.