कोथरुड – कोथरुडकरांनी दिलेला जनादेश मी आदरपूर्वक स्वीकारतो. मताधिक्य कितीही असले तरी विकासासंदर्भात मी दिलेल्या शद्बाची वचनपूर्ती करण्यामध्ये मी कोणतीही कसूर ठेवणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विजयानंतर व्यक्त केली.
कोथरुड मतदार संघातून विजय मिळविल्यानंतर संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाटील यांचे कोथरुड येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळून करण्यात आली. कोथरुड येथील शिवाजी पुतळा येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मेधा कुलकर्णी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, संदीप खर्डेकर, कोथरूडमधील नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कोथरुडचे ग्रामदैवत म्हतोबा देवाचे दर्शन सुद्धा घेण्यात आले.
याप्रसंगी ते म्हणाले, मताधिक्यचा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. विजयी झालो, कोथरुडकरांनी मला स्वीकारले आहे. त्याबद्धल मी ऋणी आहे. मी दिलेला शब्द पाळणारा आहे.कोथरुड अणि पुण्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. त्याचा प्रत्यय तुम्हाला माझ्या कामातूनच मिळेल, असेही त्यांनी सांगितले.