मुंबई – करोनावर मात करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या दारात, बाल्कनीत येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदींवर कडाडून टीका केली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले कि, मोदी देशाचे प्रमुख म्हणून काही निर्णय घेणार आहे का? कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आज गरज आहे ती मेडिकल इक्विपमेंट पुरविणे, जास्तीत जास्त राज्यांना मदत करणे, नागरिकांना धीर देणे, हे सोडून पंतप्रधान दिवे लावायला लावत आहेत, हे पंतप्रधानांचे काम आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. निदान कोरोनाच्या विषयात तरी पंतप्रधानांनी गंभीर व्हायला हवे, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला, असेही त्यांनी सांगितले आहे.
थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं @PMOIndia हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला.@INCIndia pic.twitter.com/bqQjFn5RBC
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 3, 2020