मुंबई: विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी फार ताटकळत न ठेवता त्यांच्या अंतिम वर्षांच्या परिक्षा रद्द करून त्याऐवजी त्यांनी आत्ता पर्यंत झालेल्या सेमिस्टर परिक्षांमधील गुणांच्या सरासरी गूण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधील संवादाच्या कार्यक्रमात बोलताना दिली.
ते म्हणाले की या परिक्षां नेमक्या कधी घेता येतील याचा काहीच अंदाज न लागल्याने कुलगुरूंशी व अन्य संबंधीतांशी चर्चा करून हा तोडगा काढण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्याचा लॉकडाऊन हा शब्दच कचरापेटीत टाकायला मी आलो आहे पण ही शिथिलता आपल्याला टप्प्याटप्यानेच द्यावी लागेल असे त्यांनी नमूद केले. जून महिन्यात तीन टप्प्यांमध्ये काय सुरू केले जाणार आहे याची माहितीही त्यांन दिली. राज्यातील करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयोगशाळांची संख्या 77 वरून शंभरवर नेले जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.