सदाशिवपेठ, नारायण पेठ परिसर नेहमीच भाजपसोबत राहिला
पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठ आणि नारायण पेठ या भागाचे गेले 20 वर्षे कार्यकर्ती आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. या कालावधीत या भागासाठी काम करण्याची संधी मिळाली तसेच खासदार गिरीश बापट यांच्या माध्यमातूनही या भागात आमदार म्हणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून हा परिसर नेहमीच भाजपसोबत राहिला आहे. त्यामुळे भाजपच्या या बालेकिल्ल्यात आपल्याला सर्वाधित मताधिक्य मिळेल, असा विश्वास कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केला.
टिळक यांच्या प्रचारार्थ गुरुवारी या भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी टिळक यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.
यावेळी प्रभाग 15चे नगरसेवक मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, हेमंत रासने, गायत्री खडके यांच्यासह मतदारसंघाचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे, छगन बुलाखे, गिरीजा बापट, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष स्वरदा बापट, युवा मोर्चा अध्यक्ष राजू परदेशी, सरचिटणीस अमित कंक, महिला आघाडी अध्यक्ष वैशाली नाईक, प्रभागाचे अध्यक्ष निलेश कदम, किरण जगदाळे, दिलीप पवार यांच्यासह मतदारसंघ व प्रभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
घोरपडी पेठ परिसरात पदयात्रा
टिळक यांनी घोरपडी पेठ परिसरातही पदयात्रा काढली. मीठगंज परिसरातून पदयात्रा सुरू झाली होती. मोमीनपुरा, चॉंदतारा चौक, पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ भागातील नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत केले. नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात, राजेश येनपुरे, माजी नगरसेवक विष्णू हरिहर, राजू काकडे, राजू परदेशी, अजिझ बागवान, महिला अध्यक्ष वैशाली नाईक यावेळी उपस्थित होते. तर, नगरसेवक आणि महापौर पदाच्या कालावधीत जनतेची सेवा करता आली. भेटीदरम्यान जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान मला आनंद देऊन जातो. त्यामुळे मतदार कसब्यातून निवडून देतील, असा मला विश्वास असल्याचे टिळक यांनी म्हटले आहे.