केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह : माऊलींच्या समाधीचे घेतले दर्शन
आळंदी – आळंदीतील प्रलंबित प्रश्न आणि वारकरी संप्रदायाच्या अडचणी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी दिले.
केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात श्रीक्षेत्र आळंदी येथे त्यांनी वारकरी संप्रदायाशी सुसंवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, रेणुका सिंह यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीची पूजा करून दर्शन घेतले.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक यांनी त्यांचे संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि सार्थ ज्ञानेश्वरी देऊन सन्मान केला. यावेळी शांतीब्रह्म मारुती महाराज कुर्हेकर, शिरुर लोकसभेच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,
जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, संजय महाराज घुंडरे, चैतन्य महाराज लोंढे, शहराध्यक्ष किरण येळवंडे, संत ज्ञानेश्वरी मंदिराचे मठाधिपती विष्णु महाराज केंद्रे, भागवत आवटे, माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, पांडुरंग वहिले, संतोष गावडे, दिनेश घुले, तसेच वारकरी संप्रदाय उपस्थित होते.