नगर – नगरच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांन सोबत कॅन्टोन्मेंटच्या पाणीप्रश्ना संदर्भात सविस्तर चर्चा स्टेशन कमांडर कार्यालयात झाली. यावेळी खा.डॉ सुजय विखेपाटील यांनी कॅंन्टोन्मेंटला स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेसाठी एम आय डी सी ते एम ई एस च्या मुख्य जलवाहिनी मधून टॅंब टाकून देण्यात यावा अशी मागणी केली. ही मागणी वरिष्ठांकडे पाठवून देवू असे कॅन्टोन्मेंट बोर्ड अध्यक्ष ब्रि.व्ही एस राणा यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीत अडम कमाडंट ओ.पी. शर्मा, कॅन्टोन्मेंट सीईओ विद्याधर पवार ,एम ई एस चे दोन्ही गॅंरिसन ,इंजिनिअर पारस मेस्त्री ,विपिनकुमार सिंग,एम आय डी सी चे डेप्युटी इंजिनिअर एन जी राठोड तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य प्रकाश फुलारी, रवींद्र लालबोंद्रे, संजय छजलानी, सौ शुभांगी साठे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील लालबोंद्रे, भाजपचे महेश नामदे, शिवाजी दहीहंडे, बाळासाहेब पतके आदी उपस्थित होते.
बैठकीत एमआयडीसी एमईएस कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या अडचणी मांडल्या.यावर पाणी प्रश्नासंदर्भात पुन्हा आठ दिवसांनी बैठक घेण्याचे ठरले. कॅन्टोन्मेंट म्हणते पाणी कमी मिळते.एम ई एस म्हणते आम्हाला पाणी जेवढे मिळते तेवढे ते आम्हाला कमी पडते तरीही आम्ही कॅन्टोन्मेंटला पाणी देतो.एमआयडीसी म्हणते आम्ही तर भरपूर पाणी देतो.तर मग प्रश्न असा उभा राहातो.जास्तीचे पाणी मुरते कुठे.यावरच पुन्हा चर्चा होणार असून कॅन्टोन्मेंटचा पाणी प्रश्न निकाली निघू शकतो.
दरम्यान कॅन्टोन्मेंटला एम ई एस ने ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे. ती मिळविण्यासाठी प्रयत्न करीन असे खा.विखे यांनी लष्करी अधिकारी यांना सांगितले. तसेच कापूरवाडी तलाव गाळ काढण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.पाणीप्रश्नी चर्चा बराच वेळ चालली.नंतर विखेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलला भेट दिली.