मुंबई – महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.
सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले. महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे काम भाजपने केले आहे. महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते फारच दुःखद आहेत. भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, नाहीतर जनता त्यांना माफ करणार नाही, अशी टीका अनिल देशमुख यांनी भाजपवर केली आहे.
तसेच, एम्स आणि कूपर रुग्णालयाने आपल्या अहवालातून सुशांतची हत्या झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हेतर सुशांतच्या शरीरात विष आढळून आले नसल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे सीबीआयने आपला अंतिम अहवाल लवकरात लवकर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
बिहारजे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची बदनामी केली. आता ते निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
I want to ask Devendra Fadnavis if he will campaign for Gupteshwar Pandey (Former Bihar DGP), a person who defamed Maharashtra: State Home Minister Anil Deshmukh#BiharElections pic.twitter.com/4otV7tRRd1
— ANI (@ANI) October 6, 2020
अनिल देशमुख पुढे म्हणाले, अमेरिकच्या मिशिगन विद्यापीठानेही सुशांत प्रकरणाचा अभ्यास करून त्यावर अहवाल दिला आहे. भाजपने हे प्रकरण हायजॅक केले. त्याला वेगळे वळण देऊन हे प्रकरण वेगळ्याच दिशेला नेले असून प्रसारमाध्यमांकडून मोठे करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.