रांची : जवानांच्या पत्नीने विहरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रांची पासून 40 किमी. लांब चन्ने गावात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय बजरंग भगत या जवानांचा जम्मू-कश्मीरमध्ये पलंगावरुन पडून 30 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. जवानांचे पार्थिव 1 जानेवारीला त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले होते.
गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येणार होते. पतीच्या मृत्यूच्या धक्का सहन न झाल्याने मनिता भगत यांनी गुरुवारी सकाळी विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली.
महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. दोघांचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. 2012 साली बजरंग भारतीय सैन्यात भरती झाले होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना महाराष्ट्रातून जम्मू येथे पाठवण्यात आले होते.