लखीमपूर – उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर जिल्ह्यात चहात साखर कमी टाकल्याच्या कारणावरून एकाने चक्क पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. भांडणाच्या आवाजाने तिन्ही मुले झोपेतून जागी झाली. त्यांनी आईचा किंचळण्याचा आवाज ऐकून स्वयंपाकघरात धाव घेतली. त्यांना आई जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या जोडप्याचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना तीन मुले आहेत.
पोलिसांनी याबाबत सांगितले की, चहात साखर कमी टाकल्याच्या कारणावरून पतीपत्नीत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे चिडून पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार ताब्यात घेतले असून आरोपी पतीला अटक केली आहे. साक्षीदार असलेल्या मुलांचा जबाब नोंदविला आहे.