सामनाच्या अग्रलेखातून शिर्डी व पाथरी येथील ग्रामस्थानची काढली समजूत
मुंबई – शिर्डीचे साईबाबा यांचे जन्मस्थळ कोणते यावरून शिर्डी व पाथरी येथील ग्रामस्थानचा वाद पेटला असतानाच या वादात अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला मध्यस्थी यशस्वी ठरली . याच पार्श्वभूमीवर सामनातून पाथरी आणि शिर्डीकरांचे समजूत काढण्यात आली आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख
संत साईबाबांच्या जन्मस्थानावरून कोणताही वाद मुख्यमंत्र्यांनी निर्माण केला नाही . पाथरी आणि शिर्डीकरांनीही तो करू नये . संतांचे तेज अशाने कमी होईल . जन्मस्थानाच्या वादाचे गालबोट त्याला लागू नये . या वादासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घातले , शासनाची भूमिका स्पष्ट केली . दोन्ही बाजूंचे त्यामुळे समाधान झाले आणि एक विनाकारण उद्भवणारा वाद लगेच शमला . शेवटी साईबाबांचे अवतारकार्य , त्यांनी दिलेली शिकवण महत्त्वाची . ‘ सबका मालिक एक ‘ असे साईबाबा म्हणाले . साईबाबा अवतरले , त्यांनी जनांचा उद्धार केला हे फक्त लक्षात ठेवावे !