मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने पीएमसी बॅंके घोटाळ्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्ष राऊत यांना ईडीची नोटीस आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपकडून ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप केलाय. तर दुसरीकडे भाजप नेते जर काही चुकीचं केलं नसेल तर भिण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करतायेत.
संजय राऊत पुन्हा संतापले म्हणाले,” जो मला धमकी देईल, तो राहणार नाही”
दरम्यान, राऊत यांनी पत्नी वर्ष राऊत यांनी चौकशीसाठी ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली होती. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्याकडून चौकशीसाठी उशीर केला जाण्यामागे काहीतरी काळंबेरं असल्याची शक्यता वर्तवली आहे.
संजय राऊत यांच्या पत्नीस ईडीची नोटीस; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
याबाबत भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक ट्विट केलं असून यात त्यांनी, “ED कडून तीन वेळा समन्स मिळूनही आपण जर चौकशीसाठी हजर होणार नसू तर दाल में कुछ काला है नव्हे तर संपूर्ण दालच काली आहे असे मानायला वाव आहे.चौकशीची एवढी भिती कशासाठी???” असा रोखठोक प्रश्न विचारलाय.
ED कडून तीन वेळा समन्स मिळूनही आपण जर चौकशीसाठी हजर होणार नसू तर दाल में कुछ काला है नव्हे तर संपूर्ण दालच काली आहे असे मानायला वाव आहे.चौकशीची एवढी भिती कशासाठी??? pic.twitter.com/8d8tT0fJl0
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 29, 2020
तत्पूर्वी, ईडी नोटिसीबाबत भाष्य करताना राऊत यांनी, आपल्याला धमकावले जात असून मी कुणालाही घाबरत नाही. मी या सगळ्यांचा बाप आहे असे म्हटले होते. “मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही. सरकार पाडण्यासाठी काही करु असं सांगितलं होतं, त्याला मी धमकी मानतो. जो मला धमकी देईल तो राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला.