हिंदू धर्म आणि संस्कृतीत देवाला अन्न अर्पण करून प्रसाद वाटणे हा पूजेचा अविभाज्य भाग मानला जातो. प्रसाद घेताना अनेकदा लोक काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. असे मानले जाते की, विरुद्ध हातात प्रसाद घेणे शुभ मानले जात नाही. प्रसाद घेताना नेहमी उजव्या हातानेच घेतला जातो. उजव्या हाताखाली डावा हात धरला जातो.
खरं तर, हिंदू धर्मात असे मानले जाते की प्रत्येक शुभ कार्य, ज्याचे सकारात्मक परिणाम लवकर प्राप्त करायचे आहेत, ते सरळ (उजव्या) हाताने केले पाहिजे. म्हणूनच प्रत्येक धार्मिक कार्य मग ते यज्ञ असो वा परोपकार हे सरळ हाताने करावे. जेव्हा आपण हवन करतो आणि भगवान नारायणाला यज्ञ अर्पण केला जातो तेव्हा तो फक्त उजव्या हाताने दिला जातो.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये कोणत्याही प्रकारचे विधी करताना डाव्या हाताचा वापर करणे निषिद्ध मानले जाते. मग ते देवाच्या मूर्तीला पाणी अर्पण करणं असो, त्याला अन्नदान करणं असो किंवा हवनाच्या अग्नीत साहित्य अर्पण करणं असो. या सर्वांसाठी उजवा हात वापरला जातो. यामागे शास्त्रीय कारणही आहे. वास्तविक, सरळ हात सकारात्मक ऊर्जा देणारा मानला जातो. आपल्या परंपरेनुसार प्रसाद हा देवाचा आशीर्वाद मानला जातो. असा विचार करून आपल्या पूर्वजांनी हा प्रसाद थेट हातात घ्यावा अशी धारणा केली.