मुंबई -मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल जर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दंड केला जातो, तर राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्ज या संघांदरम्यान झालेल्या सामन्यातही दोन्ही संघांनी वेळेत षटके पूर्ण केली नाहीत मग त्यांना दंड का केला गेला नाही, असा थेट सवाल माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा याने केला आहे.
नेहमी परखड वक्तव्यांबाबत प्रसिद्ध असलेल्या चोप्रा यांनी केलेल्या वक्तव्यावर आता आयपीएल समिती काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 4 धावांनी पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांकडून वेळेत षटके पूर्ण झाली नाहीत. मात्र, त्यांना कोणताही दंड केला गेला नाही, असेही चोप्रा म्हणाले.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात ज्या प्रकारे धोनीला दंज केला गेला होता, तसाच दंड या संघांच्या कर्णधारांनाही करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.