मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान थेट त्यांच्या सुरक्षेचाच प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला आहे. त्यावरून देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. आता गीतकार जावेद अख्तर यांनी या सगळ्या प्रकरणावरून केंद्रातील भाजपा सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
Our PM has met the president to discuss a vague n according to many an imaginary threat to himself when he was in a bullet proof vehicle surrounded by the body guards with LMGs but has not uttered a word when 200 M Indians are openly threatened by a genocide. Why Mr Modi ?
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 10, 2022
गीतकार जावेद अख्तर यांचे ट्विट
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान थेट त्यांच्या सुरक्षेचाच प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दावरून भाजप नेत्यांनी गेल्या काही दिवसात चांगलीच चर्चा रंगवली. स्वःताहा पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी अनिश्चित आणि अनेकांना केवळ काल्पनिक वाटणाऱ्या धोक्याबद्दल चर्चा केली. मात्र ज्यावेळी हे सर्व घडले त्यावेळी ते बुलेटप्रूफ गाडीमध्ये बसले होते आणि त्याच्या सर्व बाजूंनी हातात एलएमजी घेऊन सुरक्षारक्षक उभे होते. मात्र दुसरीकडे ज्यावेळी २० कोटी भारतीयांना उघडपणे नरसंहाची धमकी देण्यात आली तेव्हा ते एक शब्दही बोलले नव्हते असा प्रश्न विचारत Why Mr Modi ? असे लिहीत त्यांनी भाजप सरकारला प्रश्न विचारला आहे.