मुंबई – केंद्र सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करुन ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षातील लोकांवर कारवाई करत आहे. मात्र जे लोक भाजपमध्ये आहेत त्या लोकांवर ईडीचे गुन्हे दाखल होऊनही कारवाई केली जात नाही.
याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, नेते हे ईडी कार्यालयात जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितले.
भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, ते तपास का थांबवण्यात आले याची माहिती ईडी कार्यालयात जाऊन घेणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
तसेच ईडीला सहकार्य मिळण्यासाठी माहिती गोळा झाली आहे. ज्यांच्यावर तक्रारी आहेत त्यांच्याबाबतची कारवाई गतीमान करा, असे आवाहनही ईडीच्या अधिकाऱ्यांना करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.