नवी दिल्ली – राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पाडला.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही…
जय भवानी!
जय शिवाजी!!!!!!!— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2020
त्यानंतर उदयनराजे भोसले यांनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. पण, अशा कोणत्याही प्रकारच्या घोषणा सदनात चालत नाही, हे यापुढे लक्षात ठेवा, असा समज व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना दिली.
याच संदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झालाय तरी भाजपचं तोंड बंद आहे तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही जय भवानी! जय शिवाजी!!!!!!!, असं ट्विट करत त्यांनी भाजपला आणि संभाजी भिडे यांना धारेवर धरत प्रश्न विचारला आहे.’