मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यावर भाजप नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुनावलं आहे तसेच महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,’छोट्या छोट्या मुद्यावर बोलणारे गृहमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर का बोलत नाहीत? सध्या राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? रोज नववनवे फोटो आणि ऑडिओ क्लिपबाहेर येत आहे. अशा परिस्थितीतही पोलीस हातावर हात ठेऊन गप्प आहेत. पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरु आहे हे राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. ‘ असं म्हणत फडणवीस यांनी मविआ सरकारवर सडकून टीका केली आहे.