मुंबई – कोणत्याही खेळामध्ये जात महत्त्वाची नसते, त्या खेळाडुचे कौशल्य आणि त्याची खिलाडूवृत्ती नेहमीचं उजवी ठरते. मात्र सध्या भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलेले दोन खेळाडू आपल्याला जाती विषयी भाष्य करताना दिसतं आहेत, त्यामुळे क्रिकेट संघात जातीय आरक्षण आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्तर प्रदेशच्या या खेळाडूच्या विधानामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. तामिळनाडू प्रीमिअर लीगचा पहिला सामना लिका कोवाई किंग्स आणि सालेम स्पार्टन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यादरम्यान समालोचन करताना रैनाला चेन्नईच्या संस्कृतीबद्दल विचारण्यात आले होते.
#RAJPUTBOY FOREVER. Jai hind🇮🇳
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) July 22, 2021
यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या लाईव्ह सामन्यादरम्यान चेन्नईच्या संस्कृतीचे कौतुक करताना मीही ब्राह्मण आहे, असे विधान केले होते.
We all are with you @ImRaina#मैं_भी_ब्राह्मण #SureshRaina pic.twitter.com/ESmR5G6MGS
— Amit Sharma (Dogra ) (@Amit_Sharma_7) July 22, 2021
त्यांच्या या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. यातच आता टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजाही आपल्या एका ट्विटमुळे लोकांच्या निशाण्यावर आला आहे. सध्या जडेजा इंग्लंड दौऱ्यावर आहे.
त्याने ट्विट केले आहे की,’राजपूत बॉय फोरएव्हर. अर्थात नेहमीसाठी राजपूत. जय हिंद!’ या ट्विटमुळे आता सुरेश रैनानंतर जडेजा सोशलवर मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. लोक त्याला जातीवादाला प्रोत्साहन देऊ नकोस, असा सल्ला देत आहेत.
दरम्यान, जातीवादामुळे देश बर्वाद आहे. जड्डूकडून अशा पोस्टची अपेक्षा नव्हती. असं म्हणत नेटकऱ्याकडून त्यांचा पोस्टवर टीका केली जात आहे.