शाहीनबाग निदर्शकांविषयी भाजप खासदाराचे आक्षेपार्ह विधान
नवी दिल्ली – सीएए कायदा, व एनआरसीच्या विरोधात शाहींनबाग येथे गेल्या 15 डिसेंबर पासून निदर्शने करणाऱ्या निदर्शकांविषयी पश्चिम बंगालचे भाजपचे प्रमुख नेते दिलीप घोष यांनी एक आक्षेपार्ह विधान केले आहे. निदर्शकांना मरण का येत नाही असे त्यांनी म्हटले आहे, यामुळे त्यांच्या सध्या जोरदार टीका केली जात आहे.
शाहीनबाग निदर्शकांच्या विरोधात भाजपने सध्या आक्रमक मोहीम उघडली असून त्या अनुषंगाने रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पश्चिम बंगालचे भाजपचे प्रमुख दिलीप घोषसहभाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनीही या निर्शकांवर जोरदार टीका केली आहे. यामुळे सध्या नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
पश्चिम बंगालचे भाजपचे प्रमुख नेते दिलीप घोष म्हटले की,’एकीकडे पश्चिम बंगालमध्ये सीएए आणि एनआरसीला घाबरणारे लोक आत्महत्या करीत आहे. त्याचप्रमाणे जे लोक शाहीनबाग येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात प्रदर्शन करत आहे. त्यांनपैकी कुणाला मरण का येत नाही. दिल्लीतील भीषण थंडीत ते निर्देशने करत असतांना त्यांनपैकी महिला तसेच बालक आजारी का पडत नाही, शाहीनबागेतील प्रदर्शन कर्त्यांनी अमृत घेतले आहे का? या प्रदर्शन करणाऱ्या या लोकांकडे फार प्रमाणात रक्कम येते कुठून? असा प्रश्न विचारत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.