नवी दिल्ली – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनपेक्षितरीत्या व्याजदरात मोठी कपात जाहीर केली. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली आहे. तसेच करोना व्हायरसमुळे ४० वर्षात प्रथमच विकास दर शून्य टक्क्याच्या खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पी. चिदंबरम म्हणाल्या कि, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणतात मागणीमध्ये मोठी घट झाली आहे. २०२०-२१ मध्ये जर अर्थव्यवस्था वाढीचा दर शून्याखाली जाणार आहे, तर त्यांना अर्थव्यवस्थेत अधिक भांडवल ओतण्याची काय गरज आहे? त्यांनी सरकारला सांगायला हवं तुम्ही तुमच काम करा, आर्थिक उपाययोजना करा, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच रिझर्व्ह बँकेच्या विधानानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वृद्धी दराच्या १ टक्क्यांपेक्षाही कमी पॅकेजसाठी स्वत:ची प्रशंसा करून घेता? नकारात्मक विकासाच्या क्षेत्रात सरकारने अर्थव्यवस्थेला कसे ओढले याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लाज वाटली पाहिजे, असे टीकास्त्र चिदंबरम यांनी सरकारवर सोडले आहे.
Governor @DasShaktikanta says demand has collapsed, growth in 2020-21 headed toward negative territory. Why is he then infusing more liquidity?
He should bluntly tell the government ‘Do your duty, take fiscal measures’.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 23, 2020
Even after RBI’s statement, is the @PMOIndia or @nsitharaman lauding themselves for a package that has fiscal stimulus of less than 1% of GDP?
RSS should be ashamed of how the government has dragged the economy into negative growth territory.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 23, 2020