नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. कोरानोच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र आणि राज्यातील सरकार चिंतेत आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत आहेत. विशेषत: परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे भारतात कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने जगभरातील 36 देशांच्या नागरिकांना भारतबंदी केली आहे.
Some states that are ahead of the central government should go ahead and lockdown their towns and cities.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) March 19, 2020
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने सरकारसोबतच विरोधी पक्षही चिंतेत आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही सरकार लॉक डाऊन का करत नाही, असा सवाल केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. यांसंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
पी. चिदंबरम म्हणाले,’दोन रुग्णांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे गुरुवारी सकाळी निष्पन्न झाल्याने देशभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 170 वर गेली आहे. ही गंभीर परिस्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या महानिर्देशकांनी कोरोनाबाबत बुधवारी जारी केलेल्या पत्रकानंतर सरकराने देशातील सर्व गावे आणि शहरे दोन ते चार आठवड्यांसाठी लॉक डाऊन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 170 वर गेली आहे. त्यात तीनजणांचा मृत्यू झाला असून 16 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातही रुग्णांचा आकडा वाढला असून ती संख्या 49 वर गेली आहे.’