कोल्हापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानदुखीच्या त्रासावर उपचार करून घेण्यासाठी मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यावरूनही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला. उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होते. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना करोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
कोल्हापूरात पत्रकारांशी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत दररोज सकाळी बोलून बोलून दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत. संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच बोलण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संजय राऊत यांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे.
नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही. एनआयएने मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे सांगतानाच आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, असेही त्यांनी ठणकावलं.