मुंबई – बॉलिवूड अभिनेता अमिर खान व पत्नी किरण यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडली आहे. आमिर आणि किरण गेल्या पंधरा वर्षापासून सोबत आहेत. घटस्फोटाचा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र या निर्णयामुळे आमिरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
यावर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. तिने सोशल मीडिया पोस्ट मध्ये लिहिले आहे की,’कंगनाने आता बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे. यावेळी तिने मुस्लिम समुदाया संदर्भात एक प्रश्न विचारला आहे,’ हिंदू आणि मुस्लीम आंतर धर्मिय लग्नामध्ये जन्माला आलेली मूल नेहमीच मुस्लिम का होतात ?
ती पुढे म्हणाली,’या लग्नामध्ये महिला हिंदू धर्माचे पालन का करू शकत नाही. काळानुसार आपल्याला या गोष्टीही बदलायला हव्यात. ही एक जुनी प्रथा आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि नास्तिक एकत्र राहू शकतात तर मग मुस्लिम का नाही राहू शकत? एखाद्या ‘ असं म्हणत आमिर खान यांनी घेतलेल्या घटस्फोटबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.