प्रभात ऑनलाइन – ‘पोस्टमार्टम’ हा शब्द उच्चारतानाही अनेकांना भय, उत्सुकता वाटत असते. मृत शरीराचे विच्छेदन कसे करतात, किती लोक करतात, नंतर विस्कटलेले शरीर पुन्हा एकत्र कसे शिवून जोडतात, अशा असेक प्रश्नांसोबतच पोस्टमार्टम रात्री का करत नाहीत? हा ही अनेकांच्या मनात डोकावणारा प्रश्न आहे. चला तर, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे खूपच रोचक ठरेल.
वास्तविक पोस्टमॉर्टम ऑपरेशनचा एक प्रकार आहे ज्यामध्ये शवविच्छेदन केले जाते. शवविच्छेदन करण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधणे हे होय. पोस्टमार्टमसाठी मृताच्या नातेवाईकांची संमती अनिवार्य असते. तथापि, काही प्रकरणांमध्ये पोलिस अधिकारी खुनासारख्या प्रकरणातील पोस्टमॉर्टमला परवानगी देतात.
माध्यमांच्या वृत्तानुसार, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा ते 10 तासांच्या आत पोस्टमॉर्टम केले जाते. कारण मृतदेहात घडणारे नैसर्गिक बदल, उदा. मृतदेह आखडणे, यासारखे बदल दीर्घ कालावधीनंतर घडतात.
मृतदेहांच्या पोस्टमार्टमची वेळ सूर्योदय ते सूर्यास्त होईपर्यंत असते. यामागील कारण असे आहे की रात्री ट्यूबलाईट किंवा एलईडीच्या कृत्रिम प्रकाशात, दुखापतीचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसतो आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये जांभळ्या रंगाच्या दुखापतीचा उल्लेख नाही.
नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशात झालेल्या दुखापतीच्या वेगवेगळ्या रंगांमुळे पोस्टमॉर्टम अहवालास कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. भारतीय न्यायालयात स्वीकारलेल्या जे.सी. मोदी यांच्या ‘ज्युरिसप्रुडन्स टॉक्सिकॉलॉजी’ या पुस्तकातही याचा उल्लेख आहे.
रात्री पोस्टमार्टम न करण्यासाठी धार्मिक कारणदेखील दिले गेले आहे. कारण बर्याच धर्मांमध्ये रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार केले जात नाहीत. अशा परिस्थितीत, रात्री मृत व्यक्तीचे पोस्टमॉर्टम केले जात नाही.