मुंबई – परमेश्वर भक्तांची प्रतिक्षा अखेर आता संपुष्टात येत असून शाळांपाठोपाठ आजपासून राज्यातील सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे नियम असून कुठे मर्यादित संख्य्त भक्तांना प्रवेश असेल तर काही ठिकाणी आधी बुकींग करणाऱ्या भक्तांना क्युआर कोडद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या अन्याय कारक वसूली प्राधान्य धोरणामुळे आज महाराष्ट्रातील सर्व मंदिरे 105 दिवस बंद होती.. सर्व साई. गणेश, देवो, स्वामी ,भक्तांना त्यांनी त्यांच्या खोट्या इगो पोटी दर्शना पासून वंचित ठेवले. जेव्हा बार उघडले तेव्हा तेच नियम लावून ठाकरे सरकारने मंदिरे का उघडली
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) October 7, 2021
आज सकाळपासून मंदिरं उघडण्यात आली आहे. तसेच मंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जात आहे. दरम्यान भाजपा नेते राम कदम यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले राम कदम
‘महाराष्ट्र सरकारच्या अन्याय कारक वसूली प्राधान्य धोरणामुळे आज महाराष्ट्रातील सर्व मंदिरे 105 दिवस बंद होती.. सर्व साई. गणेश, देवो, स्वामी ,भक्तांना त्यांनी त्यांच्या खोट्या इगो पोटी दर्शना पासून वंचित ठेवले. जेव्हा बार उघडले तेव्हा तेच नियम लावून ठाकरे सरकारने मंदिरे का उघडली नाहीत? ह्याचे उत्तर आज खुद भवानी अन मुम्बlदेवी सुद्धा महाराष्ट्र सरकारला विचारेल . काय उत्तर देणार ? असो आम्ही 11 वाजता मुंबlदेवी दर्शनासाठी वाजत गाजत जाणार.’