प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 -आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत देत शहरी व ग्रामीण भागांसाठी एकत्रित असलेला दैनंदिन व मासिक पास बंद पीएमपीने बंद केला आहे. या निर्णयाचा फटका ग्रामीण भागांतून आलेल्या प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्ण माहिती न देता हे पास का बंद केले? असा संतप्त प्रश्न हे प्रवासी विचारत आहेत.
पीएमपीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागांत प्रवास करण्यासाठी 70 रुपयांचा दैनंदिन, तर, 1,400 रुपयांचा मासिक पास साधारणपणे चार वर्षांपूर्वी सुरू केला होता. पण, 1 एप्रिल 2022 पासून हे दोन्ही पास बंद करण्यात आले. चार वर्षात पीएमपीला यातून कोट्यवधी रुपये उत्पन्न मिळाले. तरीही, हा अचानक निर्णय झाल्याने सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. हे पास सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
दैनंदिन आणि मासिक सवलतीतील पासेस बंद केल्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्या महिला, तरुण आणि ज्येष्ठ प्रवाशांना पास बंद करण्याच्या निर्णयाचा फटका बसत आहे. – अभिजीत शिंदे, प्रवासी