पुणे – तुम्ही माध्यमंच आमच्यात भांडणं लावताय. सुखानं चाललेल्या संसारात कशाला काडी लावताय?, असा आरोप बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. “सारथी’च्या आढावा बैठकीला उपस्थित राहण्याकरिता ते गुरुवारी (दि.20) पुण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एनपीआरबाबत शिवसेना आग्रही असून, कॉंग्रेसची याबाबतची भूमिका काय असणार आहे, असे विचारताच तुम्ही माध्यमंच आमच्यात भांडणं लावताय. सुखानं चाललेल्या संसारात कशाला काडी लावताय? ज्यावेळी हा विषय चर्चेला येईल, त्यावेळी भूमिका घेऊ, असे सांगत यावर अधिक भाष्य टाळले.