नवी दिल्ली : दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.
संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज ‘चक्का जाम’ करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 पासून हे देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे. या मुद्यावरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता याचवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाल्या प्रियांका गांधी
क्यों डराते हो डर की दीवार से ? pic.twitter.com/0th1OpRu3u
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 6, 2021