नवी दिल्ली: आपले सैन्ये कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, याबद्दल कोणीही शंका घेऊ नये. असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले. कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात चीनबद्दलच्या सरकारच्या सौम्य वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्याला राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले आहे.
संरक्षणमंत्री म्हणाले की, भारताची एकता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व टिकविण्यासाठी सरकार चीन सीमेजवळ रस्ते, रेल्वेमार्ग, बोगदे आणि विमानतळ विकसित करीत आहे. भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा नसल्यामुळे बर्याच वेळा चिनी सैनिक आपल्या दिशेने येतात आणि कधीकधी भारतीय सैनिक त्याबाजूने जातात. मात्र आपली सैन्ये सतर्क आहेत आणि ते आपल्या सीमांचे रक्षण करतात याची मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो. आपली सैन्ये कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास पूर्णपणे सक्षम आहेत, याबद्दल कोणालाही शंका वाटू नये.
कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत चीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि सरकारला विचारले होते की, आपण पाकिस्तानप्रती आक्रमक आणि चीनबद्दल सौम्य का आहात? पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिला आणि चीनने पाकिस्तानला आश्रय दिला. अंदमान आणि निकोबारला चीनने जहाजे पाठविणे सुरू केले आहे. जेव्हा पाकिस्तानचा विचार येतो, तेव्हा आपल्या आवाजात आक्रमकता येते पण आपण चीनबद्दल सौम्य का आहात?
Defence Minister Rajnath Singh in Lok Sabha: India is developing infrastructure like roads, tunnels, railway lines, and air fields on the China border to ensure the unity, security, & sovereignty of the country. https://t.co/h08BvwVn8l
— ANI (@ANI) December 4, 2019