खासदार विखेंचा महाआघाडीला टोला; स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकत्र दिसत नाहीत
महाराजांच्या तुलनेत कोणीच नाही : विखे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली जाते याबाबत प्रश्न विचारला असता, विखे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्या पुस्तकांमध्ये तुलना केली ते योग्य-अयोग्य याबाबत मी बोलणार नाही. माझे म्हणने आहे की, जो संदर्भ दिला आहे त्यामध्ये पूर्ण व्यक्तीमत्वाशी तुलना केली गेली आहे की फक्त एखादी व्याख्या, प्रसंगासारखे समाजासाठी काम मोदी यांनी केले आहे हे पुस्तक वाचल्यावर कळेल. तसेच पंतप्रधान हे शिवाजी महाराज यांची जिवनशैली, कार्यशैली, तसेच त्यांचे आदर्श ठेवूनच काम करत असल्याचे विखे यांनी सांगितले.
नगर – ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे माझे मार्गदर्शक आहे. राजकीय गुरु आहेत. त्यांनी ज्या सूचना मांडल्या आहेत त्या मी अमलात आणल्या आहेत. त्यामुळे ते जे बोलले ते खरे आहे. अशा पद्धतीने प्रत्येक जण नाराजी व्यक्त करत गेला तर मुख्यमंत्री राजीनामा देतील. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्र्यामंध्ये कुरुबुरी सुरु झाल्या आहेत. खात्यामुळे मानसाला ओळख नको तर मानसामुळे खात्याला ओळख आली पाहिजे. जनतेचे सेवक म्हणून घेणाऱ्यांनी मला हे खाते नाही म्हणण्याची गरज नाही. जर तुमचे व्यक्तीगत आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी खाते लागत असतील तर त्यांनी मंत्री नव्हे ठेकेदार व्हावे असा टोला खासदार सुजय विखे यांनी महाआघाडीला लगावला.
महापालिकेत विविध कामाचा आढावा विखे यांनी घेतला.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. विखे पुढे म्हणाले की, याबाबत प्रत्येक वैचारीक राजकारणी असाच विचार करणार. आज एकतर तीन पक्षाच सरकार आल आहे. ते कस आल हे सकळ्यांना माहित आहे. ते सांगायची आवश्यकता नाही. तसेच आज शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम सरकार ने केले पाहिजे. कर्ज माफीची घोषणा झाली मात्र त्याबाबत रोजच शासन निर्यण निघत आहे. तसेच अतिवृष्ठीबाबत शेतकऱ्यांना वाढीव पैसेही मिळाले नाही. अशा परिस्थिती जे नाराजी नाट्य सुरु आज खाते वाटपावरून ऐवढा गोंधळ आहे. उद्या एखाद्या निर्णयासंदर्भात तीन वेगळ्या पक्षामध्ये कसे एक मत होईल हा ही चर्चेचा विषय आहे. नगरच्या एखाद्या प्रकल्पाला शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज दिला तर राष्ट्रवादीचा नेता त्याला पाठिंबा देइल का हा ही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे स्वत:चा स्वर्थापोटी नेत्यांमध्ये मनोमिलन झाले आहे. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एकत्र दिसत नसल्याचे विखे यांनी सांगितले.