मुंबई – नागपुरात मागील पाच वर्षात क्राइम रेट वाढला दिसून आला या काळात नागपुरातील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. या काळात नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले होते. या काळात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले होते. यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगला टोला लगावला आहे.
पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,’ मागिल पाच वर्षात नागपूर शहरात गुंडगिरी वाढली होती. या काळात अवैध धंदे , हत्येच्या घटना सुद्धा घडल्या होत्या याची संपूर्ण राज्यभर चर्चा होती. नागपूरसह राज्यात कशी काय गुंडगिरी वाढली? तसेच नागपूर शहरातील नंबर एकचा गुंड मुन्ना यादव हा कोणाचा कार्यकर्ता आहे? याचे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावे? असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त गृहमंत्री देशमुख यांनी वृत्त माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सरकारच्या कामांची आणि योजनांची माहिती दिली.