पुणे: विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हे आणि तालुक्यांच्या परिस्थितीनुसार तिथले प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. यासोबतच उद्धव ठाकरे आणि दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला उत्तर दिले.
अजित पवार म्हणाले, अवघ्या १० रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करून देण्याचं यांना आत्ता सुचलं. मग गेली ५ वर्षे यांना कुणी रोखलं होतं. झोपा काढत होते का? दोन्ही पक्षांचे मंत्री मंत्रालयात बसतात. एव्हाना गोरगरिबांना सेवा पुरवू शकत होते. पोकळ आश्वासनं देणं हा सत्तेत असणाऱ्या नेतेमंडळींचा स्वभाव आहे, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.