प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला सवाल
नवी दिल्ली: देशाचा विकास दर सहा वर्षाच्या नीचांकी पातळीवर आला असल्याच्या घटनेवरून कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भोंगा वाजवणाऱ्या भाजपने देशाची अर्थव्यवस्था पंक्चर केली आहे.
ना जीडीपी वाढताना दिसतो आहे, ना भारतीय रूपयाचे मुल्य वाढताना दिसत आहे. रोजगार गायब आहे. देशाच्या आर्थिक दूरावस्थेला जबाबदार कोण आहे हे आता तरी जाहींर केले जाईल का असा सवाल त्यांनी केला आहे. देशाच्या प्रत्येक क्षेत्रातील विकासाची आकडेवारी घटताना दिसत आहे. उत्पादन क्षेत्र, निर्यात आणि कृषी क्षेत्रातही मोठी घट होताना दिसत असून मागणी आणि गुंतवणूक या दोन्ही पातळ्यांवरील घसरणीचा सामना करणाऱ्या सरकारला आता विरोधकांच्या धारदार विरोधाचाही सामना करावा लागत आहे.