Makhanlal Sarkar :पश्चिम बंगालमध्ये आजपासून सुवेंदू सरकारची सुरूवात झाली आहे. कोलकत्ता येथील परेड मैदानावर मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला २० राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थिती दर्शवली होती. यासोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्यासह भाजपमधील अनेक बड्या नेत्यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथग्रहण सोहळ्याच्या स्टेजवर जाताच त्यांनी पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते माखनलाल सरकार यांची भेट घेत त्यांना मिठी मारली आणि त्यांच्या पाया पडले. मोंदींच्या या कृतीने मंचावर उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. कोण आहेत माखनलाल सरकार? (Makhanlal Sarkar) पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा पाया मजबूत करणाऱ्या नेत्यांपैकी सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून माखनलाल सरकार यांच्याकडे पाहिले जाते. ते ९८ वर्षांचे आहेत. माखनलाल सरकार यांचा राजकीय प्रवास संघर्षमय होता. स्वातंत्र्योत्तर भारतातील राष्ट्रवादी चळवळीतील सर्वात सुरुवातीच्या आणि प्रमुख तळागाळातील नेत्यांपैकी माखनलाल सरकार त्यापैकी एक नेते आहेत. Makhanlal Sarkar : कोण आहेत माखनलाल सरकार? ज्यांना मोदींनी घट्ट मिठी मारली आणि पायाही पडले १९५२ मध्ये, जेव्हा श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा फडकवण्यासाठी ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व केले, तेव्हा माखनलाल सरकार या मोहिमेत त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान त्यांना काश्मीरमध्ये अटकही झाली होती. पंतप्रधानांनी मंचावर त्यांचा सन्मान केल्याने हे सिद्ध होते की, ज्या ज्येष्ठ नेत्यांनी अनेक दशके संघटनेचे संगोपन केले, ते पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या स्मरणात आजही आहेत. भाजपच्या संघटनात्मक विस्तारात महत्त्वाची भूमिका (Makhanlal Sarkar) जेव्हा १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची अधिकृतपणे स्थापना झाली, तेव्हा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये संघटना उभारण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यांची पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांसाठी संघटनात्मक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचे नेतृत्व आणि संघटनात्मक कौशल्य इतके प्रभावी होते की, केवळ एका वर्षात त्यांनी पक्षात जवळपास १०,००० नवीन सदस्य जोडले. उत्तम संघटनात्मक कामगिरी (Makhanlal Sarkar) माखनलाल सरकार यांचा राजकीय प्रवास हा पक्षाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचा आणि कार्यक्षमतेचा पुरावा आहे. १९८१ पासून त्यांनी सलग सात वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. त्या काळात ही एक असाधारण आणि दुर्मिळ कामगिरी होती, कारण भाजपचे नेते सहसा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच संघटनात्मक पदावर राहू शकत नव्हते. ९८ वर्षीय माखनाल सरकार यांचे पश्चिम बंगालमध्ये पक्षासाठीची योगदान मोठे आहे. पश्चिम बंगालसारख्या आव्हानात्मक राज्यात भाजपच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत मोठा संघर्ष केला. हेही वाचा : CM Suvendu Adhikari Oath Ceremony: पश्चिम बंगालमध्ये ‘अधिकारी’पर्व! भगवा कुर्ता अन् कपाळावर टिळा… सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ