मुंबई – सध्या देशभरासह राज्यातही करोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही वांद्रे, वाधवान यासारख्या घटना धोकादायक ठरत आहेत. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमुळे सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनीही आज महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
नितेश राणे म्हणाले कि, महाराष्ट्र सरकारवर नेमके कोण खुश आहे ?? PPE कीटस नाहीत, म्हणून डॉक्टर नाराज. महाबळेश्वरच्या घटनेमुळे पोलीस खचले. राहुल कुलकर्णीच्या घटनेमुळे मीडिया नाराज. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जनता चिंतेत. सरकार आहे की एक जिवंत लाश हेच कळत नाही, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
महाराष्ट्र सरकारवर नेमके कोण खुश आहे ??
1.)PPE कीटस नाहीत, म्हणून डॉक्टर नाराज…2.)महाबळेश्वरच्या घटनेमुळे पोलीस खचले…
3.)राहुल कुलकर्णीच्या घटनेमुळे मीडिया नाराज…
4.)कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जनता चिंतेत..
सरकार आहे की एक जिवंत लाश
हेच कळत नाही !!— nitesh rane (@NiteshNRane) April 16, 2020
दरम्यान, याआधीही नितेश राणे यांनी वांद्रे प्रकरणावरून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीत आदित्य ठाकरे मोबाईलवर पाहत असल्याचा फोटो निलेश राणे यांनी ट्विट केला आहे. कॉन्फरन्समध्ये पर्यटनमंत्री मोबाईलवर खेळत बसले नसते तर आज केंद्राकडे बोट दाखवण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.