गावातील एसटी स्थानकाशेजारी एका झाडाखाली दूध विक्री तसेच स्प्लेंडरवर फिरुन दूध संकलन करताना शांताई दूध व प्रॉडक्ट कंपनीचे मालक झालेल्या वासुंदे गावातील युवकाची ही व्यावसायिक भरारी खरोखरच प्रेरणादायक ठरत आहे. 10 लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला हा व्यवसाय प्रतिदिन 40 हजार लिटरपर्यंत पोहचला आहे. शिवाय दुग्धजन्य पदार्थांचेही उत्पादन येथे सुरू झाले आहे.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषिक्षेत्रावर आधारित असल्याचे आपण अनेकदा वाचतो आणि अनुभवतोही. आर्थिक तज्ज्ञांचा हा अर्थविचार आजही कायम असला तरी गेल्या काही दशकांत कृषिवर आधारीत असलेली आपली अर्थव्यवस्था आता कृषिसह त्याच्याशी संलग्न पुरक व्यावसायाशीही निगडीत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. त्यातही कृषिला पुरक म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक आधार देणारा दूध व्यावसाय हा केवळ कृषिच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. याच विचारातून पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील जिरायती पट्ट्यात असलेल्या वासुंदे गावातील एका युवकाने आपल्या गावात दूध व्यावसाय सुरू गावातील शेतकऱ्यांसह परिसराचे अर्थकारण बदलण्यास हातभार लावला आहे. शांताई दूध नावाने उभा असलेला हा दूध प्रकल्प गावच्या श्वेतक्रांतीत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
दौंड तालुक्यात पशुवैद्यकिय म्हणून सुपरिचीत असलेल्या डॉ. हनुमंत जांबले यांच्या प्रयत्नातून आज परिसरात श्वोत अर्थातच दूध क्रांती उभी राहिली आहे. याच क्रांतीची ज्योत पेटविणाऱ्या डॉ. जांबले यांची ही यशोगाथा….
साधारणत: दहा ते बारा वर्षांपूर्वीचा काळ. डॉ. जांबले यांची घरची परिस्थिती सर्वसाधारणच. मात्र, डोळ्यात स्वप्न आणि मनामध्ये इच्छाशक्ती आणि मोठे धाडस. पण, ही स्वप्न ज्याला सांगावे आणि कोणी ऐकावे, असे कोणीही नव्हते. परंतु, धडपडी स्वभाव गप्प बसू देत नव्हता यातून सुरुवातीला किरकोळ एक, दोन व्यवसाय चालू केले पण यश नाही आले. डोक्यावर आणि पाठीवर कोणाचाही हात नव्हता. मात्र, परिस्थितीने झगडायला शिकवले. आपल्याच कर्तृत्वावर डॉ. जांभले यांचा विश्वास होता. यातून त्यांनी नविन व्यवसाय चालू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. परंतु, बाहेर बाहेर कोठेही न जाता गावात व्यवसाय उभारण्याचे ठरले, यातून गावातील शेतकऱ्यांना, युवकांच्या हाताला काम देण्याचा मानस केला. व्यावसाय करायचा हे पक्के होते. परंतु, कोणता करायचा? यावर निर्णय होत नव्हता. कारण, यात स्वत:च्या नफ्यापेक्षा डॉ. जांभले हे गावाच्या हिताचा विचार करीत होते. यातून चर्चेअंती दूध व्यावसाय सुरू करण्याचा निर्णय झाला. गावामध्ये चार ते पाच ठिकाणी दूध व्यवसाय पूर्वीपासूनच चालू होता. यामुळे अनेकांनी हा नासका व्यावसाय नका करू! असा सल्ला दिला.
परंतु, मनात जिद्द होती. गावच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्याचा दृढ निश्चय डॉ. जांभले यांनी केला होता. स्वत:सह शेतकऱ्यांचे हित साधता येईल, असा अन्य कोणताही व्यावसाय नसल्याने दूध व्यावसायच करायचा यावर शिक्कामोर्तब झाले. यातून डॉ. जांभले यांनी जुन्या स्प्लेंडर दुचाकीवरून दूध संकलनाला सुरूवात केली. गावामध्ये एसटी स्थानकाशेजारी छोट्याशा जागेवर व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. चालू केला. सुरुवातीला एकच कॅन आणि तेही स्वतःच्याच घरचे त्याचबरोबर पांढरेवाडी गावातील उमेश शितोळे व नवनाथ बनकर या दूध उत्पादकांनी पहिल्या दिवशी शांताई उद्योगसमूहात दूध देऊन खारीचा वाटा उचलला ही बदल गेली. 10 लिटरचा आकडा अवघ्या पंधरा ते सोळाव्या दिवशीच 200 लिटरवर गेला. गावाबाहेरील शेतकऱ्यांशीही संपर्क वाढला तरच दुधसाठा वाढेल, ही बाब लक्षात येताच डॉ. जांभले यांनी स्प्लेंडरवरून गावोगावी फिरुन प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात शांताई दूध प्रकल्पाबाबत विश्वास निर्माण केला. यातून वासुंदे पंचक्रोषिसह परिसरातील पाच, सहा गावातील शेतकरीही डॉ. जांभले यांच्याकडे दूध देवू लागले. गावातून तसेच गावाबाहेरूनही दुधसाठा मोठ्या प्रमाणात वाढू लागला. व्यावसाय वाढू लागला तसे अडथळे, अडचणीही वाढू लागल्या. यातून गावकारभाऱ्यांसह तालुका ते अगदी राज्यपातळीवरील शासकीय अधिकारी, राजकीय नेते मंडळींशी संपर्क वाढला. व या व्यवसायातून शेतकऱ्यांचे हित साधत असतानाच आपोआपच राजकीय पदावर काम करण्याची संधी मिळाली. व्यावसाय करुन राजकारण करतानाच डॉक्टरांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केले.
तालुक्यातील गावागावात काही सामाजिक कार्यक्रमांसह क्रीडा स्पर्धेसाठी शांताईच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, खेळाडूंना बक्षीसाच्या स्वरुपात तसेच गावोत्सवासह अन्य सार्वजनमि उत्सवात शांताई परिवाराचा सहभाग वाढला यातून गरजवंतांनाही नि:स्वार्थपणे मदत केली जावू लागली. यातून दूध व्यावसायात शांताई नावाचा वासुंदे गावचा नवा ब्रॅण्ड उदयास आला. आज, पुणे जिल्ह्यातील अनेक नांमाकित कंपन्यांना दूध पुरवठा करण्याबरोबरच शांताई दूध सर्वत्र पोहचत आहे. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर येत्या काळात भर दिला जाणार असून यातून वासुंदे गावचेच नव्हे तर परिसरातील अन्य गावातील शेतकऱ्यांचेही अर्थकारण बदलणार आहे.
(संकलन : निलेश जांबले, वासुंदे)