नगर – शहरात गेल्या काहि दिवसांपासून डेंग्युचे थैमान सुरू असून या रोगाचे रुग्ण इतक्यामोठ्या प्रमाणात वाढले की त्यांना आवश्य्क असलेल्या पांढऱ्या पेशींचा पुरवठा करण्यास नगरच्या रक्तपेढ्या अपुऱ्या पडल्या. त्यातूनच कदाचित रक्तपेढ्यांध्ये रकाचा तुटवडा असल्याचा संदेश गेला. मात्र रक्ताचा तुटवडा नसून पांढऱ्या पेशींवा तुटवडा असल्याची माहिती पुढे आली आहे.
नगरमध्ये शासकिय आणि खासगी मिळून सात रक्तपेढ्या आहेत. यापैकी मनपाच्या रक्त पेढीतून केवळ रक्तपुरवठाच केला जातो.
या बाबत शहरातील अन्य रक्तपेढ्यांधी संपर्क साधला असता .त्यांनीही वरील माहितीस दुजोरा दिला. त्याबाबत अधिक माहिती देतांना आठ रक्तगटांपैकी गेल्या महिनाभरात ए पॉझिटीव्ह या गटाच्या रक्ताला सर्वाधिक मागणी असल्याने त्याचा पुरवठा अधिक केला गेला. कित्येकदा पांढऱ्यापेशांच्या पुरवठ्यासाठ्रर डॉक्टरही अमुक एका ग्रुपचीच रक्तपिशवी हवी असे सांगतात त्यामुळे त्या रक्तगटाच्याच पांढऱ्या पेशींचा पुरवठा करावा लागतो. शिवाय य पांढऱ्या पेशींचे आयुष्य केवळ 5 दिवसांचे असल्याने त्या रुग्णाला तातडीने द्याव्या लागतात.
सध्या डेंग्यु आजाराचे रुग्ण मोट्याप्रमाणावर असून गेक्या पंधरवड्या पुर्वी दिवसागणिक 30 ते 40 रुग्ण येत असल्याने त्यावेळी त्या रुग्णांसाठी पांढऱ्या पेशींचा पुरवठा करावा लागल्याने रक्त कमी पडू लागले होते मात्र या आठवड्यात परीस्थिती सुधारली असून डेंग्युच्या रुग्णांची संख्या घटली असून सद्या रोज 5ते 7 डेंग्युचे रुग्ण पांढऱ्या पेशी मागण्यासाठी येतात. पांढऱ्या पेशी साठवून ठेवता येत नसल्याने ऐनवेळी रुग्णाच्या रक्ताच्या चाचण्या घेवून पांढर्या पेशींचा पुरवठा केला जातो. शिवाय सध्या अनेक निमित्ताने रक्तदान शिबिरे घेतली जात असल्याने रक्ताचा तुटवडा नाही.