नवी दिल्ली- रिझर्व बॅंकेने केलेल्या मोठ्या व्याजदर कपातीचे उद्योग जगताने स्वागत केले आहे. कर्जाचे हप्ते भरण्यास आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही उपाय योजना बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांना लागू होण्याची गरज असल्याचे भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
बीएफसी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करतात त्यामुळे एनबीएफसी बळकट होणे करत असल्याचे ते म्हणाले त्याचबरोबर सध्याची परिस्थिती पाहता एक वेळ कर्जाची फेररचना आवश्यक आहे कंपन्यांना बॅंका अधिक कर्ज देणार आहेत ही स्वागतार्ह बाब असल्याचे ते म्हणाले.
फिक्कीच्या अध्यक्ष संगीता रेड्डी यांनी सांगितले की अशा परिस्थितीत उद्योगजगत आणि रिझर्व बॅंकेने परस्परांच्या संपर्कात राहून आगामी काळात आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे या संघटनेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की कर्जाचे व्याजदर कमी झाले असले तरी त्याच प्रमाणात बॅंकांमध्ये भांडवल सुलता उपलब्ध होण्याची गरज आहे अन्यथा कमी व्याजा वरील कर्जाचा उपयोग होणार नाहीपम