मुंबई – यंदा राज्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. भाज्यांच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांचं महिन्याचं बजेट कोडमडलं आहे.
वाढलेल्या किंमतीत भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहक टाळाटाळ करत असल्याचं भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे. याआधीचा कांद्याचा दर ७० ते ८० रुपये होता. आता तर कांद्याने शंभरी पार केली आहे.
भाजीपाल्याचे भाव –
भेंडी – ५० रू. किलो
फ्लॉवर – ४० रू.किलो
दुधी – ४० रू. नग
कांदे – ६० रू. किलो
गाजर – ५० रू. किलो
बीट – ४० रू. किलो
टोमॅटो – ३५ रू. किलो
कोथिंबीर जुडी – ५० रू. जुडी