नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता त्यावेळी राजधानी दिल्लीमध्ये त्यावेळी चौथी लाट सुरु होती. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केजरीवाल सरकारने आता लसीकरणावर जोर दिला जाणार आहे. त्यातच लोकांमधील गोंधळ दूर करून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केजरीवाल सरकारने ‘जहां व्होट, वहा वैक्सिनेशन’ अर्थात ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं, तिथेच नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः या अभियानाची घोषणा केली.
करोनाच्या चौथ्या लाटेमुळे दिल्लीत भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. जवळपास महिनाभर दिल्ली सरकार आणि प्रशासनाला चौथ्या लाटेने हैराण करून सोडले होते. दिल्ली सरकारने आता नागरिकांचा गोंधळ होऊ नये यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली. “दिल्ली सरकार आजपासून ‘जहा व्होट, वही वैक्सिनेशन’ (ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं, त्याच मतदान केंद्रावर लसीकरण केलं जाणार) कार्यक्रम सुरू करत आहे. या कार्यक्रमातंर्गत ज्या मतदार केंद्रावर मतदान केलं, त्याच मतदान केंद्रावर लसीकरण केले जाईल, त्यामुळे लस घेण्यासाठी त्या मतदान केंद्रावरच जावं, अशी माहिती लोकांना दिली जाणार आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याला लवकरच सुरूवात केली जाईल. पुढील चार आठवड्यात ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचं लसीकरण केलं जाईल,” अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.
करोनाच्या विळख्यात जीव गमावलेल्या मृतांच्या वारसांना केंद्र सरकारने चार लाखांचे अर्थसहाय्य घोषित करून लगेच ती मदत मागे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्राकडून अर्थसहाय्यासाठी अनेक वारसांनी अर्ज केले. परंतु हे अर्ज केंद्राच्या सुधारित आदेशामुळे बाद ठरले आहेत.