मुंबई – मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जीवित व वित्तहानी झाली आहे. अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरफीच्या तुकड्या अथक परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या कलाकारांना पुरग्रस्तांना मदत करतांना दिसत नसल्यावरून कान उघाडणी केली होती. तर आता या मुद्यावरून मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी सोनू सूदला खोचक प्रश्न विचारला आहे.
कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?#KonkanFlood #SonuSood #WhereIsMashiha @SonuSood @mnsadhikrut pic.twitter.com/ucTAknzQ3c
— Shalini Thackeray (@ThakareShalini) August 3, 2021
त्यांनी ट्विट केले आहे की,’कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान ‘मसीहा’चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..?’ असा सवाल शालिनी ठाकरे यांनी विचारला आहे.
दरम्यान, देशातील महामारीच्या काळात देशभरातील गरजूंना मदत करणारा दानशूर अभिनेता सोनू सुद ही ओळख देशात निर्माण केली मात्र कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र मदत करतांना दिसत नसल्यामुळे शालिनी ठाकरे यांनी टीका केली आहे.