परभणी:गेल्या चार वर्ष दुष्काळाचा शेष सरकार गोळा करतेय मग हा गोळा केला जाणारा शेष जातोय कुठ याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी जिंतूरच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांना केले.
शिवाय, १६ हजार कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्याचा फायदा झाला आहे. तुमच्या माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीला नुकसानभरपाई मिळावी म्हणून विमा भरला जातो परंतु त्यांना हा पीक विमा मिळत नाहीय. जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना होती तर पाणी कुठे मुरलंय हेही जनतेला सांगावं असा जाब डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारला.