मुंबई- ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या प्रचंड ताणतणावाचं वातावरण आहे. मालिका रोज नव्या वळणावर दिसते आहे. अनिरुद्ध शिवाय दिवाळीचा सण साजरा झाला. त्यामुळे अनिरुद्ध राग अनावर झाला आहे. दिवाळीच्या दिवशी अनिरुद्धने घरातील वातावरण खराब केलं.
आपल्या शिवाय देशमुखांच्या घरात दिवाळी साजरी होणार नाही. या हेतूने अनिरुद्ध दिवाळीच्या दिवशी घरी आला मात्र घरातील चित्र वेगळंच होतं. गेले २५ वर्षांची पुजेची परंपरा अरुंधतीने मोडत. लक्ष्मीपुजन केलं. हे पाहून अनिरुद्ध भारावला. त्याच रागात तो संजनाकडे परत जातो.
संजनावर चिडचिड करतो. संजना त्याला चांगलंच खडसावताना दिसली आहे. माझ्य़ा घरात राहायचं असेल तर माझ्यावर आवाज चढवायचा नाही, असं ती अनिरुद्धला खडसावते. त्यामुळे अनिरुद्धला काही काळ घर सोडल्याचा पश्चात्ताप होतो.
दरम्यान, मालिकेत नव्य़ा पात्राची एन्ट्री झाली आहे. या पात्राला सगळं कळू नयेे, यासाठी कुटुंबीयांचे प्रयत्न सुरु आहे. मात्र त्या पात्राला सगळं कळ्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. यावर अनिरुद्धचं काय मत असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.