गुवाहाटी : काँग्रेस पक्ष आज आपला 135 वा स्थापना दिवस साजरा करीत आहे. यावेळी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्ली येथील पार्टी मुख्यालयात ध्वजारोहण केले. त्याचवेळी प्रियंका गांधी वड्रा यांनी लखनौमध्ये भाजपवर जोरदार निशाणा साधला. तर गुवाहाटीत पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एका जनसभेला संबोधित करत आहेत.
#WATCH Rahul Gandhi in Guwahati: Hum BJP aur RSS ko Assam ki history, bhasha ,sanskriti par akraman nahi karne denge. Assam ko Nagpur nahi chalayega, Assam ko RSS ke chaddi wale nahi chalayenge. Assam ko Assam ki janta chalayegi. pic.twitter.com/hzg4qaPRPv
— ANI (@ANI) December 28, 2019
गुवाहाटी येथील सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले, ‘भाजपा जेथे जेथे जातो तेथे, तेथे द्वेष पसरवितो. तारूण आसाममध्ये प्रदर्शन करत आहेत. इतर राज्यातही निदर्शने होत आहेत. भाजप त्यांना का मारत आहे? जनतेचा आवाज भाजपला ऐकायचा नाही.
पुढे ते म्हणाले आम्ही भाजप, आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांना आमच्या भाषा संस्कृतीवर आक्रमण करू देणार नाही. आसामला नागपूर चलवनार नाही. आसामची जनता हे राज्य चालवेल असे खडे बोल त्यांनी सुनावले.