मुंबई – शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद विकोपाला गेला असून मागील आठवड्यापासून हा वाद सुरू आहे. अद्यापही एकमेकांवर सुरू असलेली टीका टीप्पणी थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. त्यातच आता नितेश राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात. त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचं टीका नितेश राणे यांनी केली. तसेच राऊत नेमके शरद पवार यांचे आहेत की उद्धव ठाकरे यांचे त्यांना माहीत नाही असं सांगताना अतिशय शेलक्या शब्दात त्यांनी टीका केली.
राज्यात सत्तेत असलेले बैल पळवल्याशिवाय बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळणार नाही असं ही ते म्हणाले. दरम्यान शिवसेनेनं खेळ सुरु केला होता, आता आम्हाला आमच्या पद्धतीनं खेळ संपवावा लागेल, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला.