मुंबई – खगोलीय अविष्कार कंकणाकृती सूर्यग्रहण आज झालं. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसलं. खगोलप्रेमींसह सर्वांनीच हे विलोभनीय दृश्य पाहिलं. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हे सूर्यग्रहण दिसू शकलं नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सूर्यग्रहण पाहिलं. मात्र ढगांमुळे सूर्य दिसला नाही असं ट्विट मोदींनी केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे यांनी कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुंडे यांनी सूर्यग्रहण होताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींवर ट्विट केलं आहे.
आर्थिक डबघाई
बेरोजगारी
महिला सुरक्षा#CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार
कायदा सुव्यवस्थादिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? #solareclipse2019 pic.twitter.com/uSFPI766YT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 26, 2019
“आर्थिक डबघाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, #CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार, कायदा सुव्यवस्था याकडे सरकारचे लक्ष वेधत दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे”. तसेच, धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटसोबत सूर्यग्रहण पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रही पोस्ट केले आहे.