नवी दिल्ली – भारतीय वाहन उद्योगात सध्या प्रचंड मंदीची लाट आहे. या मंदीमुळे देशातील वाहन उद्योग आर्थिक संकटाच्या विळख्यात गुरफटलेला आहे. या मंदीच्या लाटेमुळे देशभरातील कर्मचारीवर्गावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर ट्विटरद्वारे टीकास्त्र सोडले आहे.
प्रियांका गांधी म्हणाल्या कि, अर्थव्यवस्था मंदीच्या खड्ड्यात जात आहे. लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आहे. वाहन क्षेत्र आणि ट्रक क्षेत्रात झालेली घट हे उत्पादन-वाहतुकीत नकारात्मक वाढ आणि बाजाराचा घटते चिन्ह दर्शवित आहेत. सरकार डोळे कधी उघडणार?, असा सवालही त्यांनी ट्विटवरवरून विचारला आहे.
अर्थव्यवस्था मंदी की गहरी खाई में गिरती ही जा रही है। लाखों हिंदुस्तानियों की आजीविका पर तलवार लटक रही है।
ऑटो सेक्टर और ट्रक सेक्टर में गिरावट प्रोडक्शन-ट्रांसपोर्टेशन में निगेटिव ग्रोथ और बाजार के टूटते भरोसे का चिन्ह है।
सरकार कब अपनी आँखें खोलेगी? https://t.co/9zaGPJxslu
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 10, 2019
दरम्यान, अर्थव्यवस्थेत मंदी असल्याने काही दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा या वाहनविक्री कंपनीने विक्री होत नसल्याने वाहनांचे उत्पादन 5 ते 13 जून 2019 दरम्यान बंद होते. मारुती सुझुकीनेही गाड्यांची अपेक्षित विक्री झाली नसल्याने 23 ते 30 जून 2019 दरम्यान आपला प्लॅंट बंद ठेवला होता. अशातच सोमवारी हिंदुजा ग्रुपच्या वाहन उद्योगातील अग्रगण्य असणाऱ्या अशोक लेलॅंड कंपनीनेही कामबंद दिवस जाहीर केला.
अर्थव्यवस्था करके चौपट
मौन बैठी है सरकार
संकट में हैं कम्पनियाँ
ठप्प हो रहा व्यापारड्रामे से, छल से, झूठ से
प्रचार से करके कपट
जन-जन से छुपा रहे
देश की हालत विकट#100DaysNoVikas https://t.co/b3hZJP7NbC— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 8, 2019