मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. दुष्काळ, मराठा आरक्षण आदी प्रश्नांवरून त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यातल्या मराठा तरूण-तरूणांना राज्य सरकारने फसवले आहे. आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते आहेत कुठे आहेत असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.
राज ठाकरे म्हणाले, राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली तर आरक्षणाची गरजच लागणार नाही.. मोदी सरकारविरोधात मी बोलतो आहे कारण त्यांनी कामं केली नाहीत. स्वप्न दाखवून त्यांनी भ्रमनिरास केला. जर कामं केली नाहीत तर कोणतंही सरकार असो त्याविरोधात बोललंच पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले.
दुष्काळासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले, दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला ?, दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या ?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.