नवी दिल्ली – अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्ती अशा देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. अशामध्येच सोशल मीडियावरही त्यांना आदरांजली दिली जात आहे.
सुषमा स्वराज उत्तम वक्त्या तर होत्याच यासोबतच हजरजबाबी उत्तरांमुळे त्या अनेक वेळा चर्चेत आल्या होत्या. सोशल मीडियावर सुषमा स्वराज यांची ऐतिहासिक भाषणे आणि मुलाखती व्हायरल होत आहे. यामध्येच पाकिस्तानच्या धर्तीवर तेथील एका टीव्ही चॅनेलवर सुषमा स्वराज यांनी पाकला सुनावले. हा व्हिडीओ सुषमा स्वराज यांनी स्वतः १९ ऑक्टोबर २०१३ रोजी शेअर केला होता.
My PTV interview after the Kargil war. https://t.co/VTPpxApWpr
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) October 19, 2013
कारगिल युद्धानंतर ८ मार्च २००२ रोजी पाकच्या एका टीव्ही चॅनेलने सुषमा स्वराज यांची मुलाखत घेतली होती. यामध्ये त्यांनी आतंकवाद, कारगिल युद्ध आणि सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन या मुद्यांवर सडेतोड उत्तरे दिली होती. या मुलाखतीत सुषमा यांना एका प्रश्न विचारला कि, भारत शांतीच्या गोष्टी करतो तर सीमेवर सैन्य तैनात का केले आहे? यावर सुषमा स्वराज म्हणतात, शांतीचा प्रस्ताव मांडल्यानंतरही कारगिल युद्धासारखी भेट मिळत असेल तर असे करायला लागते. कोणीचीही सीमेवर जवानांना तैनात करण्याची इच्छा नाही. परंतु, अनेक वेळा परिस्थिती गंभीर असतात. या प्रश्नांचे उत्तर तुमचे सरकार चांगल्या प्रकारे देईल, असे त्यांनी सांगितले.